दिवाळी/दीपावली सणाची संपूर्ण माहिती Diwali (Dipawali) sanachi sampurn mahiti.

दिवाळी।दीपावली मराठी निबंध.


दिवाळी/दीपावली सणाची संपूर्ण माहिती Diwali (Dipawali) sanachi sampurn mahiti

दिवाळी/दीपावली सणाची संपूर्ण माहिती

दिवाळी।दीपावली सण।diwali san nibandh mahiti in marathi हा एका प्रकारे "दिव्यांचा उत्सव" असतो.हिवाळा सुरू होतानाच असतो,म्हणजे पावसाळा ऋतू संपून सर्व ठिकाणी हिरवेगार झाडेझुडपे,गवत आणि उल्हासमय वातावरण असते,निसर्ग शांत झालेला असतो,पशू ,पक्षी तृप्त झालेले असतात. 


Join : Whats App Channel


कारण पाऊस पडून गेलेला असल्याने, सर्व ठिकाणी चारा पाणी सहज उपलब्ध असते.त्यामुळे दिवाळी जवळ येताना लहान मुलांपासून सगळ्या ठिकाणी आनंदाचे, उल्हासमय वातावरण तयार झालेलं असते.भारतात तसेच हिंदू धर्मात अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असा दिवाळी/दीपावली सण समजला जातो.


या सणाला बाजारपेठा भरभरून गेलेल्या असतात.तसेच सणाची घरोघरी जोरात तयारी सुरू झालेली असते.बाजारपेठेत खरेदी विक्री ची लगबग सुरू असते.मग घरातील सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू पासून किराणा मालाचे दुकान गर्दीने भरून गेलेले असतात.शाळांना सुट्टी असते.त्यामुळे लहान मुले खेळण्यात दंग असतात.


आपल्या मनात दिवाळी विषयी अनेक प्रश्न असतील जसे दिवाळी हा सण का साजरी करतात,दिवाळी सण विषयी माहिती,दिवाळी सण निबंध कसा लिहावा तर आपण दिवाळी सण म्हणजे काय असतो याविषयी माहिती घेऊ. 


दिवाळी सणाचे महत्व

दिवाळी/दीपावली सण हा एक प्राचीन हिंदूंचा उत्सव आहे.जो शरद ऋतूमध्ये येत असतो. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी कार्तिक अमावस्या असते.रात्री अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार असतो.या दिवशी दिवे लावून या अंधारावर विजय मिळवला जातो,अशी आख्यायिका आहे. की याच दिवशी दिव्यांनी अंधारी रात्रीवर विजय मिळवला जातो.या दिवशी माता लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि आपल्या भक्तांसोबत आनंद सामायिक करत असतात. 


तसेच भारतात अशी आख्यायिका आहे की,चौदा वर्षांचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम सीतेसह आयोध्या मध्ये परत येतात, तेव्हा घरोघरी हजारो दिवे लावून आयोध्या शहर फुलांनी,रांगोळीने आणि दिव्यांनी सजवली होती.म्हणून या दिवशी दिवाळी सण साजरा करण्याची प्रथा पडली. दिवाळी सणाचे पाच दिवस असतात. त्याच पाच दिवसाचे पाच वेगवेगळे महत्त्व आहे.ते पाच दिवस कोणते आणि त्यांचे महत्व पुढीलप्रमाणे आहे.


दिवाळीचे पाच दिवसाचे महत्त्व

1.धनोत्रयोदशी/धनतेरस

2.नरकचतुर्दशी

3.लक्ष्मीपूजन/दीपावली

4.पाडवा /बलिप्रतिपदा

5.भाऊबीज


1.धनोत्रयोदशी/धनतेरस 

या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हटले जाते. दिवाळीचा सणाचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी ला सुरू होतो. या दिवशी सर्व दिवे,पणत्या, आकाशदिवे ,लाईट माळा,लावून सजावट केली जाते.असे म्हणतात की घरातील एकही दिवा रिकामा ठेऊ नये सर्व दिवे तेलाने पाजळून ते प्रज्वलित करावेत.


सर्वजण आपापल्या घराची व परिसराची सजावट करतात. याच दिवशी बाजारात जाऊन मौल्यवान वस्तू म्हणजे सोने,चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करतात, कारण हा दिवस शुभ मानला जातो ,अशी आख्यायिका समजले जाते की साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी केल्यास त्याचा लाभ चांगला होतो. 


म्हणून या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करण्यासाठी लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. शरीर निरोगी ठेवण्याची देवीला प्रार्थना केली जाते. या दिवशी धन्वंतरी देवीचा वाढदिवस असतो अशी पूर्वीपासून चालत आलेली आख्यायिका आहे. या दिवशी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करते, म्हणून धनवंतरीला पूजा ही पाचदिवसांपैकी एक महत्वाची आहे.


2.नरकचतुर्दशी 

हा या पाच दिवसांपैकी दुसरा दिवस असून या दिवशी सूर्यदेव उगवण्याचे अगोदर स्नान केलं जाते. त्यालाच अभ्यंगस्नान असे म्हटले जाते.याचदिवशी उटणे लावून आंघोळ करतात.या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक सणाची आख्यायिका वेगवेगळी सांगितली जाते. 


प्रत्येक सणाला पूर्वी काहीतरी वेगवेगळ्या घटना घडून गेलेले असल्याने रूढी परंपरेनुसार हे सण साजरे केले जातात आणि या सणाचा आनंद हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने समाजामध्ये सामाजिक बांधिलकी एकमेकांविषयी आदर ,प्रेम आपुलकी इत्यादी गोष्टी वाढीस लागतात.


याच दिवशी देवीने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. ज्याने सर्व भुतलावावर जनतेला खूप त्रास दिला होता.म्हणून पहाटे अभ्यंगस्नान केले जाते . तेव्हापासून या दिवसाला नरकचतुर्दशी म्हटले जाते.


3.लक्ष्मीपूजन/दीपावली

दिवाळीच्या पाच दिवसांपैकी हा दिवस तिसरा दिवस खूप महत्वाचा आहे.तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच भगवान गणेश, सरस्वती,भगवान कुबेर यांची पूजन केले जाते.तसेच वर्षभर आपल्या घरातील केरसुणी चा वापर केर भरण्यासाठी करतो म्हणून तिला धुवून तिला हळद, कुंकू, झेंडूची फुले, वाहून पूजा करतात. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करतात आणि कायम स्वरूपी असेच आमच्या घरी राहावे, म्हणून सर्व घरातील लहान-थोर व्यक्ती देवीला प्रार्थना करतात. 


सर्व देवी देवतांची पूजा करून घरामध्ये सर्व ठिकाणे दिवे लावून, आकाशकंदील लावून, फटाके फोडून,देवी लक्ष्मीची स्वागत करतात. तिला मनोभावे नैवेद्य दाखवतात ,नैवेद्य मध्ये वेगवेगळे गोड गोड पदार्थाचे समावेश करुन सर्व देवी देवतांची पूजा केली जाते.पूजा करण्याची वेळ साधारण सायंकाळी असते.योग्य त्या वेळी लक्ष्मी पूजन करणे महत्वाचे समजले जाते.वेगळ्या प्रकारची फुले, रंगीबिरंगी लाईट यांची घरात व परिसरात डेकोरेशन केले जाते. 


घरातील सर्व धनद्रव्य, मौल्यवान वस्तू,यांची पूजा केली जाते.तसेच पूजेसाठी घरात असणारे सर्व दिवे तेल घालून उजळले जातात.असे म्हटले जाते की घरातील एकही दिवस विना पेटवता ठेऊ नये.तसेच सर्वांचे दाग दागिने यांची पूजा केली जाते. तसेच घरातील दारे-खिडक्या सर्व उघडे ठेवून संध्याकाळी मनोभावे माता लक्ष्मीदेवीची पूजा घरातील सर्व लहानथोर मंडळी करतात.म्हणून या दिवसाला लक्ष्मीपूजन किंवा कुबेरपुजन असे म्हटले जाते.


4.पाडवा /बलिप्रतिपदा

हा दिवस दिवाळीच्या सनातील वर्षप्रतिपदा म्हणून ओळखला जातो.या दिवशी राजा विक्रम सिंहसणावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातील जनतेचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या हाताने उचलून घेतला होता आणि सर्व प्राणिमात्रा ची रक्षा केली होती.या दिवसाला गोवर्धन पूजन म्हटले जाते. या दिवशी पती-पत्नी एकमेकांना छान उपहार देऊन एकमेकांना आनंद वाटला जातो. तसेच याच दिवशी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. म्हणून या दिवसाला प्रतिपदा किंवा पाडवा असे म्हटले जाते.


5.भाऊबीज 

पाचवा दिवस हा भाऊबिजेचा सण असतो.याच दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि बहिण-भावाचा हा प्रेम आपुलकी आदर निर्माण करण्याचा दिवस समजला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून आपल्या भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, तसेच भाऊ आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू देऊन तिचा आदर सन्मान ठेवून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.तसेच हा सण रक्षाबंधन सणाप्रमाणे साजरा केला जातो.


या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा आदर निर्माण करणारा हा दिवस आहे म्हणून या दिवसाला भाऊबीज असे म्हटले जाते.हा दिवस दिवाळीच्या पाच सणांची पैकी शेवटचा दिवस असून या दिवसाला विवाहित बहीण भावाकडे किंवा माहेरी येत असते.चार दिवस माहेरी राहून परत आपल्या सासरी जात असते.


अशा प्रकारे हिंदूधर्मामध्ये दीपावलीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा सण संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे .अगदी भारतीय लोक इतर देशात कामानिमित्त जरी राहत असली तरी, हा सण ते अति उत्साहाने साजरे केले जातात.अशा प्रकारे आपण दिवाळी सण निबंध,दिवाळी सण विषयी माहिती घेतली.

Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने