नागपंचमी सण: कथा, महत्व, उपवास, पूजाविधी.

नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती मराठी.

नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती मराठी

नागपंचमीचा सण कधी असतो?


नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला येतो.नागपंचमी ला श्रावण पंचमी असेही म्हणतात.

 

नागपंचमी हा सण का साजरा करतात?

नाग किंवा सर्प या प्राण्याबद्दल समाजात आदर व पूज्य भावना निर्माण व्हावी तसेच नागाविषयी गैरसमज दूर व्हावे, म्हणून नागपंचमीचा सण साजरा करतात.नागाला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हटले जाते. 


Nag Panchami Festival All Information In Marathi श्रावण हा सणांचा महिना असून,श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीचा सण येतो.हिंदुधर्मात नागाची पूजा खूप वर्षापासून करण्यात येते.नागपंचमी या सणाच्या दिवशी नागाचे पूजन केले जाते.श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत असतो.संपूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली असते.


Join : Whats App Channel


सगळीकडे प्रसन्न वातावरण असते,श्रावण महिन्यात शेतामध्ये वेगवेगळी पिके उभी असतात,या पिकांची वेगवेगळे कीटक,बेडूक, उंदीर यांचा शेतकरी बांधवांना खूप त्रास होत असतो.हे सर्व पिकांची नासधूस करत असतात आणि त्यामुळे अन्नधान्य उत्पन्नामध्ये घट होते.


अशावेळी उंदीर घूस यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्प हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडतो.सर्प हे उंदरांचा आहार म्हणून उपयोग करत असतात.त्यामुळे या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते.सर्पाला शेतकर्‍याचा मित्र असे म्हटले जाते.


नागपंचमी च्या सणाचा उपवास:

नागपंचमीच्या सणाला नवीन विवाहित स्रीयांसाठी विशेष महत्वाचा असतो.नवीन विवाहित या सणाला आपल्या स्रीया माहेरी येतात.आपल्या हातावर मेंहंदी काढतात.तसेच गावांमध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन नाग पूजनासाठी वारुळाला जातात.पुजा करतात.नाग देवाची गाणे,फेर,झोके बांधून झोके खेळतात,महिलांसाठी या सणाचे विशेष महत्व आहे. 


नागपंचमीच्या सणाला स्रीया आपल्या भावासाठी उपवास धरतात त्याची एक कथा सांगितली जाते.स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे.तर हिंदू धर्मशास्त्रात याबद्दल नक्की काय सांगतं याबद्दल जाणून घेऊ.


खूप वर्षापूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक देवी होती.सत्येश्‍वर हा तिचा भाऊ या सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला.तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले आणि त्या वेळी त्या नगाणे  तिला वचन दिलं की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील,तिचे रक्षण मी नक्की करेन आणि त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री,प्रत्येक महिला नागपंचमीचा सण साजरा करते. 


नागपंचमीचा उपवास करण्याचे महत्त्व असा आहे की, सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरी ने अन्नत्याग केला.तिने अन्नग्रहण केले नाही आणि म्हणूनच या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात.त्या पाठीमागे भावना अशी असते की,आपल्या भावना चिरंतन आयुष्य प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक संकटातून त्याचा बचाव व्हावा.


सत्येश्‍वरी चा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला आणि त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी तिला दिली आणि अलंकार देऊन तिला सजवले.त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.


नागपंचमीच्या सणाच्या दिवशी हातांवर स्त्रिया मेहंदी काढतात.स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावांच्या प्रत्यक्ष आयुष्य नक्की वाढते.नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करून  नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपात भगवान शिव शंकरांची पुजा करणे होय.


श्रावण महिना भगवान शिव शंभू चा आहे.तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करने म्हणजेच सगुण रूपात पूजा केल्या प्रमाणे आहे. 


नागपंचमी सणाची कथा:

एक नगर होतं तिथं एक शेतकरी होता.त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला आहे.नागपंचमीचा दिवस आहे.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेलेला होता.नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागांची नागकुळा होती.त्यांना नांगराचा फाळ लागला.


दुदैवाने लवकरच ती मेली.काही वेळानं तिथं नागीन आली.आपलं वारूळ पाहू लागली,वारूळ नाही आणि पिल्लंही नाही.ती इकडे तिकडे पाहू लागली.तेव्हा नांगर रक्तानं भरलेला तिला दिसला.


तर असं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगराने माझे पिल्लू व वारूळ नष्ट झाले.नगिनीने राग मनात ठेवला आणि शेतकर्‍याचा निर्वंश करावा असं मनात आणले आणि धावतच ती शेतकर्‍याच्या घरी गेली.


शेतकऱ्याच्या मुलाबाळांना,लेकी सुनांना,शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला.त्याबरोबर ती सर्वजण मरून पडली.तिला समजलं की या शेतकऱ्याची एक मुलगी सुद्धा आहे आणि ती शेजारच्या गावी दिली त्या मुलीला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली.


ज्या गावी मुलगी दिली होती,त्या ठिकाणी आली,त्या घरी घरी बाईनं पाटावर नाग नागिन नऊ नागाचे चित्र काढली आहे,त्यांची पूजा केली आहे,दुधाचा नैवेद्य दाखविला आहे,नागाला लाह्या,दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत.


मोठ्या आनंदाने पूजा पाहून ती नागिन संतुष्ट झाली,दूध पिऊन समाधान पावली,त्या शेतकऱ्याच्या मुलीची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच होती.


इतक्यात मागे उभी राहिली नगिन पाहून मुलीला म्हणून लागली बाई बाई तू कोण आहेस?तुझे आईबाप कुठे आहेत? म्हटल्यावर त्या मुलीने डोळे उघडले बघते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली ,ती घाबरू लागली तेव्हा नगिन तिला म्हणली घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे,आपली सगळी हकीकत त्या मुलीने  सांगितली  आणि हे काही चांगलं नाही,असे नगिणीच्या मनात आले.


तेव्हा आपल्या आई-बाबांना जिवंत करण्याचा करण्याचा उपाय त्या मुलीने विचारला तेव्हा  तिला नागिनीने अमृत दिले,ते अमृत घेऊन ती त्याच पावली माहेरी आली,सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं आणि सगळी माणसं जिवंत झाली.


सगळ्यांना आनंद झाला.बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली.तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करायचं?विधी बाबत संगितले आणि  शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही,नागपंचमीच्या दिवशी जमीन खणु नये,भाज्या चिरुन नये ,तव्यावर शिजवू नये,तळलेलं खाऊ नये,नागदेवतेला नमस्कार करावा,तेव्हापासून शेतकरी नागपंचमी च्या दिवशी नागाची मनोभावे पुजा करतात. 


नागपंचमीची नागाची पुजा कशी करतात. 

नागपंचमीच्या दिवशी नागाच्या चित्रांची पूजा करतात,पूजेसाठी दूध,लाह्या,फुटाणे वाहून प्रसाद म्हणून उकडीचे मोदक तसेच पुरणपोळी करतात.


या दिवशी स्रीया वारुळाला जातात,त्याठिकाणी वारूळ असेल तेथे जाऊन अगरबत्ती,हळदी कुंकू ,दोरा,पाणी,लाहया,दूध,त्या वारुळात वाहतात,हळदी कुंकू लावून दोरावाहतात,आणि काही दोरा आपल्या हातात बांधतात.नमस्कार करतात. 


ज्यांना वारुळाला जाने शक्य नाही ते घरी भिंतीला नागोबाचे चित्र भेटते ते दुकानातून घेऊन येतात आणि ते चित्र भिंतीवर चिटकून त्या चित्राची पुजा करतात.तसेच घरातील सर्वजण पुजा करून नमस्कार करतात. 


नागपंचमीचा सापाविषयी संदेश।नागाबद्दल गैरसमज.

नागपंचमीच्या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी गारुडी जिवंत सापला किंवा नागाला दूध पाजतात.नाग अथवा कोणताही सर्प हा दूध कधी पीत नाही.कारण दूध पिणे हे त्याचे अन्न नाही.साप किंवा नाग हा केवळ उंदीर बेडूक असे जिवंत प्राणी त्याचा आहार असतो.साप हा दूध न पिणारा प्राणी आहे.नागपंचमीच्या दिवशी मात्र अनेक ठिकाणी काही गारुडी यांना यांना दूध पाजण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करतात.


काही लोक या सापांना अनेक दिवस उपाशी ठेवतात आणि नागपंचमीच्या दिवशी या सापासमोर दुधाची वाटी भरून मांडतात भुकेच्या पोटी ते दूध प्राशन करतात.अशावेळी टोपलीत ठेवलेले नाग त्या टोपलीत घाण करतात आणि त्यांना दूध बाधा होते.आपल्या अज्ञान व अंधश्रद्धा यामुळे हजारो नाग मृत्युमुखी पडत आहेत,त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.सर्प संख्या कमी झाली म्हणून सापाविषयी गैरसमज दूर व्हावा म्हणून अध्यात्म आहे.


निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी नागाचे अथवा सापाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.तसेच जर आपल्या घराजवळ साप अथवा नाग आढळून आल्यास आपल्या जवळील सर्प मित्राला फोन करून त्याला सुरक्षित मानवी वस्ती मधून लांब जंगलात सोडून देणे हे आपली कर्तव्य आहे.या हिंदू संस्कृती पशू,प्राणी,पक्षी यांच्या विषयी प्रेमाची भावना वाढीस लागावी.म्हणून हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.

Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने