रायगड: रायगड किल्ल्याचा इतिहास, पाहण्यासारखे ठिकाणे, शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ.

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती,Complete information of Raigad fort.

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Complete information of Raigad fort
रायगड किल्ला

नमस्कार,या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला  रायगड किल्ला याविषयी संविस्तर माहिती घेणार आहोत,ज्याप्रमाणे मागील काही पोस्ट मध्ये  आपण सिंहगड किल्ल्याची माहिती घेतली,तसेच शिवनेरी किल्ला, पन्हाळा किल्ला  याविषयी सुद्धा माहिती घेतलेली आहे. 

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती:

नाव-रायगड किल्ला.
उंची - 820 मीटर /2700 फूट.
प्रकार - गिरिदुर्ग.
ठिकाण-रायगड ,महाराष्ट्र.
स्थापना - 1030.
जवळचे गाव - महाड,रायगड.

रायगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान:

रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे.छत्रपती शिवाजीराजांनी रायगड चे स्थान आणि महत्त्व ओळखून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्यभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाची संरक्षित स्मारक आहे. 

रायगड किल्ल्याचा इतिहास:

रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव "रायरी" असे होते. युरोपचे लोक त्यास "पूर्वेकडील जिब्राल्टर" असे म्हणत असत.जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम किल्ला होता.पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप प्राप्त नव्हते.तो नुसता एक डोंगर होता.तेव्हा त्यास राशीवट व तनस होतं अस अशी दोन नावे होती .

रायगड किल्ल्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले. निजामशाही मध्ये रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर राहू लागला. तर प्रतापराव मोरे विजापूरास पळून गेले. 

Join : Whats App Channel

शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरी म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली.त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला होता व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी करून घेतला होता. 

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले भले ते अधिक अवघड ठिकाण असून सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबुद्वीप असे होते. 

रायगड किल्ल्याचे 15 विविध नावे:

1रायगड 
2.रायरी 
3.इस्लामगड 
4.नंदादीप 
5.जंबुद्वीप 
6.तनस 
7.राशीवाटा 
8.दूरगिरी 
9.राजगिरी 
10.देवगड 
11.रेड्डी 
13.शिवलंका 
14.राहिरे आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. 

उंच आणि प्रशस्त ठिकाण तसेच कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही, हे बघून महाराज खुषीने म्हणाले, "तख्तास जागा हाच गड करावा" शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत केलेला आहे.रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावर राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले.

रायगड चे जुने नाव रायरी गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुंज, उत्तरेकडे टकमक टोक तसेच शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे .

Join : Whats App Channel


शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाची स्वामी होते. याची आठवण देणारे गड स्वामिनी शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधलेले आहे. ते श्री शिरकाई मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यात लागुन डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाई चा घरटा हा नामफलक होता. शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 29 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या वेळी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मन सोन्याचे म्हणजेच 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार, या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. 

24 सप्टेंबर 1674 ललितापंचमी अश्विन शुद्ध 5 आनंद संवत्सर शके 1596 च्या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.  

रायगड किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाण.

रायगडावरील पाचाडचा जिजाबाईचा वाडा:

उतारवयात जिजाबाईंना गडावरचा थंड हवा वारा मानवत नसे. म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी जवळ एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. याला तक्क्याची विहीर असे म्हणतात.

रायगड किल्ल्यावरील खुबलढा बुरूज:

गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता. त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

रायगडावरील नाना दरवाजा:

या दरवाजाला नाणे दरवाजा असे म्हणतात. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674 च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील Henri Oxzendan याच दरवाज्याने तो आत आला.या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत . त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. 

रायगड किल्ल्यावरील मदर मोर्चा किंवा मशीद मोर्चा:

चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाट भाग लागतो. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून, दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात 

रायगड किल्ल्यावरील महादरवाजा:

महादरवाजा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूला दोन सुंदर कमळाकृती कोरलेली आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मीबाई महादरवाजा ला दोन भव्य बुरूज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदी मध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात, त्यास जंग्या म्हणतात. 

शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. गुरूच्या मधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

रायगड किल्ल्यावरील चोर दिंडी:

महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते. त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. दरवाजापर्यंत येण्यास पायऱ्या आहेत.

रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव:

महादरवाजातून पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव आहे. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

रायगडावरील गंगासागर तलाव:

हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्म शाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नास-साठ पावले चालत गेल्यावर, जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणून याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिव शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल 

रायगड किल्ल्यावरील स्तंभ:

गंगासागर चा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे. ते हेच असावेत ते पूर्वी पाच मजले होते ते असे म्हणतात .त्याचा आकार द्वादशकोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

रायगड किल्ल्यावरील पालखी दरवाजा:

स्तंभाचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात.त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा होय. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

रायगड किल्ल्यावरील मेना दरवाजा:

पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग असलेला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास अवशेष दिसतात. ते आहेत राण्यांचे महाल मीना दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. 

रायगड किल्ल्यावरील राज भवन:

राणी वर्षाचा समोर डाव्या हातास दास-दासी चा दरवाजा दिसतात या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राज भावना चा चौथरा खूप मोठा आहे. रत्नशाळा राज प्रसाद जवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही रत्नशाळा या खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

रायगडावरील राज्यसभा:

महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला. तीच ही राजसभा राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. 

रायगडावरील सभासद बखर:

"तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जोडा व केली"

रायगडावरील नगारखाना:

सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना आहे. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीचा असतो.

रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ:

नगारखाना कडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते. तो होळीचा माळ तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ इथेच या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही जसेच्या तसेच आहे.

रायगडावरील शिरकाई देवी मंदिर:

शिरकाई चे देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस चे छोटे देऊळ दिसते. ते शिरकाई देवीचे देऊळ आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गड स्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे.

रायगडावरील जगदीश्वर मंदिर:

बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. 

मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे "सेवेचे ठायी तत्पर हिरोजी खेळकर" या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख आहे. त्याचा अर्थ असा होतो की,

"सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके 1596 मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना शुभ मुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे आशांची उभारणी केली आहे ती चंद्रसूर्य असेपर्यंत खुशाल नांदो."

रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांची समाधी:

मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो, तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते - क्षत्रिय कुलावतंस श्री महाराज शिवराज महाराज छत्रपती यांचे काल 1602 चैत्रशुद्ध 15 इसवी सन1680 या दिवशी रायगड येथे झाला. 

रायगडावरील कुशावर्त तलाव:

होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाक डे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.वाहक दरवाजा महाराजांनी महादरवाजा शिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले. तरी दोर लावून खाली उतरून जाऊ शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

रायगड किल्ल्यावरील टकमक टोक:

बाजारपेठेच्या समोरील वरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष मिळतात .जसे जसे टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

रायगड किल्ल्यावरील हिरकणी टोक:

गंगासागर चा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोली वाढत जाते, ती हिरकणी टोकापर्यंत जाते हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफा ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचारण खुबलढा बुरूज मशीद मोर्चा हे ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आले आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही ठिकाणे खूप महत्त्वाचे आहेत.

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी:

इतिहासात असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांच्या अंतिम संस्कार चालू होता. त्या वेळी शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाचा कुत्रा आणि त्या आगीत उडी घेतली होती.

अशा प्रकारे रायगड किल्ल्याची माहिती असून माहितीमध्ये काही चुकीचे असल्याचे आढळून आले तर आमच्याशी संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने