शिवरायांच्या शूरवीर मावळ्यांविषयी माहिती मराठी.

शिवरायांच्या शूरवीर मावळ्यांविषयी माहिती.

छत्रपती शिवाजी महाराज : यांच्या शूरवीर मावल्यांविषयी आपण ऐकत आलेलो आहेत. सर्व मावळे हे प्रामाणिक आणि हुशारीने आपले कामे करत असत. अशाच मावळ्यांची माहिती आपण या लेखाच्या आधारे आपण घेणार आहोत.



Table of content:
Table of content(toc)


शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी .

अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजांच्या तोंडचे पाणी पळविणारा वीर योद्धा म्हणजे मुरारबाजी देशपांडे होय.पुरंदर च्या लढाईत आपल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरारबाजी देशपांडे होय.महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे जन्मगाव होते. 


मुरारबाजी देशपांडे हे कर्तुत्ववान होते,त्यामुळे शिवाजी महाराज यांनी त्यांच्या वर जबाबदारी सोपवून त्यांना स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेतले.पुरंदरच्या तहात पुरंदरच्या लढाईची शिवरायांच्या या जीवाभावाच्या माणसांचा आणि वीर जवानाचा अंत झाला. 


शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी.

बाजीप्रभू देशपांडे हे एक शूर मावळे होते,ते स्वराज्यासाठी एकनिष्ठा राहून काम करणारे आणि स्वामिनिष्ठ होते.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ते पिढीजात देशपांडे होते.तसेच ते हिरसड मावळचे वतनदार सुद्धा होते.शिवरायांनी त्यांच्यामधील धैर्य,पराक्रम आणि प्रशासकीय कौशल्य पाहून या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला स्वराज्य कार्यात सहभागी करून घेतले,बाजीप्रभू देशपांडे लढवय्ये होते.तसेच ते त्यागी आणि प्रामाणिक होते.तसेच बाजीप्रभू देशपांडे स्वामीनिष्ठ सैनिक होते.


पावनखिंडीतील लढाई मध्ये त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि शिवाजीराजे  विशाळगड पर्यंत पोहचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली.इथेच शत्रूचा मुकाबला करताना धारातीर्थी पडले.त्यांची समाधी विशाळगडावर आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. 


शूरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी.

तानाजी मालुसरे शिवरायांचे बालपण चे सवंगडी होते.त्याच बरोबर ते स्वराज्याचे सैन्यातील सुभेदार देखील होते. स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी मध्ये त्यांचा सहभाग होता.अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी तानाजी मालुसरे यांनी खानावर तुटून पडत उत्तम कामगिरी बजावली होती.कोंढाण्यावर उदयभानसिंह राठोड आणि तानाजी यांच्यात तुंबळ लढाई झाली.


यावेळी तानाजींनी यशवंती नावाच्या घोरपडीच्या साह्याने  गड सर केला. गडावर झालेल्या लढाईत उदयभानसिंह राठोड आणि तानाजी दोघेही मारले गेले.तानाजी निधनाची बातमी राजांना समजताच राजांना अत्यंत दुःख झाले आणि हे दुःख व्यक्त करताना "गड आला पण सिंह गेला" अशा शब्दात राजे व्यक्त झाले. 


शूरवीर येसाजी कंक यांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी.

येसजी कंक यांची स्वराज्यासाठी कामगिरी मोठी आहे.स्वराज्यस्थापनेच्या आधीपासूनच ते स्वतः शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांची एकनिष्ठ  सेवा करणारे एक मावळे होते.ते वेलवंड खोर्‍यातील एक प्रसिद्ध देशमुख होते.शिवाजी महाराज यांच्यासोबत ते दक्षिण दिग्विजय च्या मोहिमेत सहभागी होते.त्यांनी अनेक विजयी मोहिमीचे नेतृत्व केलेलं होत.येसजी कंक हे महाराजांचे एक विश्वासू सरदार म्हणून ओळखले जात होते. 


गोवळकोंड्याच्या बादशहाच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते. फोंडा किल्ल्याचा किल्लेदार येसजी कंक होता.पोर्तुगीज मराठा युद्धात त्यांची कामगिरी खूप मोठी असून अगदी थोड्या सैनिक असताना बलाढ्य पोर्तुगीज यांच्यासोबत ते लढले,पोर्तुगीज यांची फौज खूप मोठी असल्याने यात येसजी कंक जायबंदी झाले व त्यात त्यांचा मुलगा मारला गेला. 


शूरवीर शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी.

शिवा काशिद हे शिवरायांचे मावळे होते.शिवा काशिद हा नावाशिवाय शिवरायांचा इतिहास अपूर्णच! व्यवसायाने शिवाजी महाराजांचे नाव्ही असलेल्या शिवा काशिद हे अगदी महाराजांसारखे दिसत ,त्यांची अंगकाठी रुपरेषा सुद्धा शिवाजी महाराजांसारखी होती. महाराजांचे कपडे शिवा काशिद  घालायला दिली तर नवीन माणूस नक्की ओळखू शकणार नाही, इतके साम्य दोघांमध्ये होते. 


शिवरायांवर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.म्हणून तर महाराज सुखरूप सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले.या शूर वीर मावळ्यांना त्यांच्या बलिदानामुळे महाराजांचे स्वतंत्र्य राज्याचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.अर्थात महाराजांचे नेतृत्व सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते.अशा या मर्द मराठी मावळ्यांची समाधी आजही पन्हाळगडावर आहे. 


आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने