शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाची रचना.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे राज्याचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेले होते. आजही ते अष्टप्रधान मंडळ सर्वाना परिचित आहे.
Table Of Contents :
Table Of Content(toc)
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील विविध पदे आणि त्यांची रचना.
शिवाजी महाराज मोठ्या मोठ्या कालावधीसाठी मोहिमेवर असत,तसेच शिवाजी महाराज यांना वेगवेगळ्या प्रांतांची,किल्ल्यांची,तसेच स्वराज्याची कामगिरी पार पाडावी लागतअसे.तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय,त्यांचे संरक्षण,आणि त्यांची सर्व जबाबदारी,तसेच कोणावर अन्याय होऊ न देणे,परकीय सत्ता यांना वेळीवेळी लढाया करून स्वराज्याची संरक्षण करण्याची जबाबदारी सांभाळावी लागत असे.
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील पदे:
मुख्यप्रधान
मुजुमदार
सेनापती
सचिव
वाकनिस मंत्री
पंडितराव
न्यायाधीश
डबीर
स्वराज्याचे चिटणीस
शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था.
हे सर्व करणे एकट्याचे काम नव्हते म्हणून त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी आपल्या स्वराज्यातील शूर वीर विश्वासू मावळे यांना महाराज यांच्या अनुपस्थितीत तसेच उपस्थितीत स्वराज्याचा कारभार चालवणे,त्याचे कामकाज करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाची माहिती पुढीलप्रमाणे.
1) मुख्यप्रधान
मोरोपंत पिंगळे हे मुख्य प्रधान म्हणून कामकाज करत असत.मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा राज्यकारभार पाहत असत.
मुख्यप्रधान यांचे कामे :
सेना घेऊन नित्यनवीन प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करत राहणे.
नेमून दिलेल्या प्रदेशाचा कारभार करणे.
सर्वांशी समान बुद्धीने सर्वांच्या अनुमतीने वागून कोणाशी द्वेष बुद्धी न करता सर्वांना सोबत घेऊन चालावे.
शिवाजी महाराजांकडून सही होऊन आलेल्या पत्रांवर आपली सही करावी लागत.
राजाच्या गैरहजेरीत मुख्यप्रधान कामकाज करत असे.
या मुख्य प्रधान चा पगार होता वर्षाला पंधरा हजार होन.
शत्रूची बातमी काढून त्यांचा पराभव करणे.
2) मुजुमदार
मुजुमदार म्हणजे अमात्य हे राज्याचे महसूल मंत्री होत.रामचंद्र नीलकंठ हे मुजूमदार म्हणून काम पाहत होते.
मुजुमदार यांचे कामे:
मुजुमदार यांनी सर्व राज्यातील उत्पन्नाचा व खर्चाचा जमाखर्च पाहावा.
हे काम दप्तरदार फडणीस यांच्या कडून करून घ्यावे.
फडणीस चिटणीस यांच्या पत्रांवर आपली सही करावी .
लष्कराच आधिपत्य करून युद्ध करावे.
शिवाजी महाराज जो प्रदेश निवडून देतील त्याचा कारभार दक्षतेने करावा.
महसूलमंत्र्यांना वार्षिक पगार होता 12000 होन.
3) सेनापती
सेनापती म्हणजेच सेना प्रमुख हे काम हंबीरराव मोहिते करत असत.
सेनापती चे कामे :
सर्व सेनेचे रक्षण करावे.
सैनिकांचे वेतन वेळच्यावेळी देण्याचे काम यांचे होते.
ते पराक्रम गाजवू की त्यांचा गौरव छत्रपतींची मंजुरी घेऊन छत्रपतींच्या हस्ते करावा.
त्यांना छत्रपती माणसांवर बक्षीस द्यावे.
सेनेचे अधिपत्य करून युद्धादी प्रसंग करावें.
स्वराज्याचा सेनापतीला पगार होता वर्षाला दहा हजार होन.
4) सचिव
सचिव यांनी सर्व पत्रव्यवहार चे कामकाज करावे लागे.अण्णाजी दत्तो हे सचिव म्हणून कामकाज पाहत असत.
सचिवा ची कामे :
छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार स्वतः सचिव यांनी पहावा त्यात कमी-अधिक अक्षर असतील त्याचा शोध करून त्यांना नीट करावे.
तसेच महाल परगणे यांच्या तपासणी सचिव यांनी करावी.
राजपत्रावर संमत असे लिहावे.
युद्धादि प्रसंग करून जिंकलेल्या मुलखाचा चा कारभार करावा.
स्वराज्याच्या सचिवांना पगार होता वर्षाला दहा हजार होन.
5) वाकनिस मंत्री
शिवाजी महाराज यांच्या राजदरबारात वाकनिस मंत्री म्हणून दत्ताजी त्रिंबक यांनी राज्याच्या राजकीय व राजनैतिक बाबी सांभाळाव्या.त्यांनी वाकनिस मंत्री म्हणून काम पहिले.
वाकनिस मंत्री यांचे कामे:
यांच्याकडे महाराजाचे खाजगी काम व लक्ष देण्याचे काम असे.
परत दरबारातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागे.
शिवाजी महाराजांची दिनचर्या लिहावी लागे.
त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवावी लागे.
छत्रपतींच्या भोजनातील पदार्थाची तपासणी यांना करावी लागे.
राज्यकार्याविषयी दक्ष राहून युद्धादि प्रसंग करावें.
राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
स्वराज्याचा मंत्र्यांना पगार होता वर्षाला दहा हजार होन.
6) पंडितराव
पंडितराव म्हणजे धार्मिक व सांस्कृतिक कार्य प्रमुख होय.रघुनाथ पंडित हे शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानतील पंडितराव म्हणून काम पाहत होते.
पंडितराव यांचे कामे :
पंडित यांनी सर्व धार्मिक बाबींवर अधिकार चालवावा.
पंडीत विद्वान ब्राह्मण यांचा सन्मान करावा.
अपराध्यांना शिक्षा करावी.
समाजातील परंपरा आचार-विचार प्रायश्चित्त संबंधीच्या पत्रांवर सह्या कराव्या.
वसमत असे चिंतन करावे.
स्वराज्याचा पंडितरावांना पगार होता वर्षाला दहा हजार होन.
7) न्यायाधीश
स्वराज्याचे न्यायाधीश म्हणून निराजी रावजी काम पाहत होते.
न्यायाधीश यांचे कामे :
राज्यातील सर्व प्रकारच्या खटल्यांवर अधिकार चालवावा लागत.
खटल्यात धर्म अधर्म पाहून अपराध्यास शिक्षा करावी लागत असे.
न्यायाच्या निवड पत्रांवर संमत असे चिन्ह करावे हे काम पहावे लागत.
छत्रपतींच्या चारित्रा ला दोष लागणार नाही अशा निपक्षपातीपणे न्याय करावा लागे.
स्वराज्याचा न्यायाधीशांना पगार होता दहा हजार होन.
8) डबीर
सुमंत हे डबीर म्हणून राज्यकारभारात कामकाज पाहत होते.
डबीर याचे कामे :
सुमंत यांनी परराष्ट्र व्यवहार पाहावं लागे.
परराज्यातील राजकारणावर लक्ष ठेवावे.
परराज्यातील वकील येतील तेव्हा त्यांचे स्वागत करावे व त्यांची बडदास्त राखावी.
परराज्यातील राजकारणी छत्रपतींना निवेदन करावीत युद्धादि प्रसंग करावें आणि राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
या विदेश मंत्र्यांना पगार होता दहा हजार होन.
9.स्वराज्याचे चिटणीस :
शिवाजी महाराजांचे चिटणीस म्हणजे सामान्य अधिकारी नव्हते.राजदरबारात त्यांना प्रधानासारखाच मान मरातब होता,किंबहुना त्याहून अधिक राजांच्या खास विश्वासातील त्यांना समजले जात.बाळाजी आवजी प्रभू हे महाराजांचे चिटणीस होते.
त्यांची हुशारी व कार्यक्षमता पाहून महाराजांनी त्यांना अष्टप्रधान मंडळातील पद देऊ केले होते.परंतु बाळाजी आवजी यांनी ते नाकारले होते.
राजांचा खास पत्रव्यवहार व राजनीतिक पत्रव्यवहार लिहिण्याचे काम या चिटणीस यांच्याकडे होते आणि त्याबद्दल त्यांना चिटणीसशी वतन राजांकडून मिळाले होते.
शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था :
स्वराज्याच्या प्रत्येक कार्यालयात त्यांच्या हाताखाली अधिकारी असत. त्यांना दिवाण,मुजुमदार,फडणीस,सबनीस, कारखानीस,चिटणीस,जामदार असत.चिटणीसांना वार्षिक सहा हजार रुपये पगार होता आणि फडणवीसांना 3000 होन इतका पगार होता.
शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील पेशवा सेनापती पासून अगदी खालच्या पातळीवरील शिपाई कारकून पर्यंत प्रत्येकाने आपला पगार धान्याच्या किंवा रोकड यांच्या स्वरूपात सरकारी खजिन्यातून आणि कोठारात घ्यावा असा महाराजांचा दंडक होता.यांच्या पगाराची रक्कम निश्चित ठरलेली होती आणि ती नेहमी ठरलेल्या वेळी त्यांना मिळत असे.महाराजांनी आपल्या प्रधान मंडळातील एकाही प्रधानाला जहागीर दिली नव्हती.
जहागीर पद्धतीत जहागीर एखादा प्रांत दिला जातो,त्या प्रांताचा महसूल तो घेतो व बंडखोरी करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करतो. शिवाजीराजांना हे संकट टाळायचे होते.म्हणून त्यांनी प्रधान किंवा अन्य कोणत्याही अधिकार्याला जहागिरी दिली नाही.
राज्याच्या महत्त्वाच्या निर्णय कागदपत्रांवर प्रधान मंडळातील महत्त्वाच्या प्रधानाच्या सह्या व्हाव्या लागतात.सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर मुख्य प्रधान,अमत्य,सचिव,मंत्री,सुमंत यांच्या साह्य घ्याव्या लागत.ही महत्त्वाची पद्धत महाराजांनी सुरू केली होती.
त्याचे कारण उघड होते,महत्त्वाचे निर्णय घेताना चुका होऊ नये,तसेच तो निर्णय सर्वांच्या नजरेखालून जावा,अशा प्रकारे प्रधानमंडळ राज्यकारभाराची जाणीव व्हावी व कारभार अधिक कार्यक्षम व्हावा.म्हणून महाराजांनी ही प्रथा पाडली होती.शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या राज्यकारभार यंत्रणेच्या केंद्रस्थानी स्वतः छत्रपती होते.
अष्टप्रधान त्यांच्या खात्यातील लहान मोठे अधिकारी अठरा कारखाने,बारा महाल,सरसुभेदार पायदळ,घोडदळ व आरमार या तिन्ही दलातील लहान-मोठे लष्करी अधिकारी व ठेवणारे चिटणीस किल्लेदार इत्यादी मिळवून राज्यात एक मोठी कारभार यंत्रणा उभी राहिली होती.या यंत्रणेची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणावर छत्रपतींच्या कर्तबगारीवर अवलंबून होती.छत्रपतींच्या हाती सर्व प्रकारचे अंतिम अधिकार होते.