महात्मा गांधी यांचे बालपण:
सत्य व अहिंसा वर प्रेम करणारे महात्मा गांधी अशी त्यांची वेगळी ओळख आहे.त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत.
महात्मा गांधीजी यांचे वडील वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते.महात्मा गांधी याची आई पुतळीबाई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या.बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली,परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.
वडिलांनी आणलेले पितृ भक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले आणि राजा हरिश्चंद्र यांचे नाटक पाहिले.हरिश्चंद्र यांचे यांच्या सत्य पालनाचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला दिसून येतो.हरिश्चंद्र सारखे आपणही सत्यवादी व्हावे असे त्यांना वाटू लागले.
लहानपणी त्यांना भुताची भीती वाटत असे,त्यावेळी आईने त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगितले.पुढील जीवनात त्यांना त्याचा फार उपयोग झाला.तसेच तुळशी रामायणाच्या वाचनाने ईश्वर भक्तीची ज्योत त्यांच्या रूदयात प्रज्वलित झाली.वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांची झाला.
इ.स.1885 मध्ये त्यांचे वडीलांचे निधन झाले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले.
परंतु यासाठी गांधीजीचा आईची परवानगी नव्हती.मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थाचे सेवन करणार नाही,अभक्ष्य भक्षण करणार नाही.परस्त्रीला स्पर्श करणार नाही.असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले.1891 साली महात्माजी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले.
Join : Whats App Channel
महात्मा गांधी यांचे कार्य:
महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्यभर सत्याचे पालन केले आणि जगाला सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला.महात्मा गांधीजींनी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आल्यावर मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला,मात्र त्यांना वकिलीच्या व्यवसायात फारसे यश आले नाही.
अतिशय बुद्धिमत्ता असलेल्या गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय व्यापार्यांनी आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेला नेले.
अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापार्याला न्याय मिळवून दिला.दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत महात्मा गांधीजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणांची माहिती झाली.कृष्णवर्णीयांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले.
प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला.गौरवर्णीय प्रमाणे कृष्णवर्णीयांना वागणूक मिळावी,यासाठी महात्माजींनी जे कार्य केले ते सुवर्णाक्षरात करण्यासारखे आहे.गांधीजीनी बुद्धचरित्र आणि भगवतगीता वाचली गीतेचे सखोल चिंतन केले व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला.
महात्मा गांधींना टॉलस्टॉयची वैकुंठ माझ्या हृदयात आहे.नावाचे पुस्तक वाचले.रस्किन चे सर्वोदय हे पुस्तक जाणून घेतले.सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण सामावलेले आहे,याची त्यांना जाणीव झाली व उद्देश शिक्षणापेक्षा त्यांनी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजेच चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिलेले आपल्याला दिसून येते.
महात्मा गांधींना सत्य आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता,त्यात मध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, याची त्यांना जाणीव होती.त्यांची राहणी साधी होती,पण विचारसरणी उच्च होती.त्यांना फिरोज शहा मेहता हिमालयासारखे वाटत होते.लोकमान्य टिळक समुद्रासारखी व नामदार गोखले गंगे सारखे वाटत.
भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पहिला व त्यांनी दूर केला.सत्याग्रह,सविनय कायदेभंग,शस्राशिवाय प्रतिकार,असहकाराच्या नवीन साधनांचा पुरस्कार केला.देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला.हिंदू-मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
जातिभेद हे त्यांना मान्य नव्हता.त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली.अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले.हे सर्व कार्य ते निस्वार्थी बुद्धीने करीत होते.गीतेतील निष्काम कर्मयोग हे ते आचरनात होते.जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली. राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी 1920 मध्ये काँग्रेसचे नेतृत्व चे सूत्रे हाती घेतली.महात्मा गांधीजींचे कार्य पाहून स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली.1942 चले जाव आंदोलन,भारत छोडो आंदोलन असे इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती.
Join : Whats App Channel
इंग्रजांनी लाठीमार,गोळीबार केला अनेकांना तुरुंगात घातले.पण इंग्रजांचे काहीही चालले नाही.1947 ला भारत देश स्वतंत्र झाला.भारताची फाळणी झाली.भारताची फाळणी अनेक लोकांना योग्य वाटली.
परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करत असताना 30 जानेवारी 1948 साली गोळी मारून ठार केले.गांधीजीच्या मुखात त्यावेळी हे राम! हे शब्द होते.महात्मा गांधींना हुतात्म्यांचे मरण आले.
सत्य व अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19 व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले.त्यामुळेच महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
महात्मा गांधी यांनी असहकार,अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.त्यांनी सत्याग्रह केला,तुरुंगवास भोगला,आंदोलने केली आणि शेवटी इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले.
महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार.
"तुम्हाला आनंद तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही जे विचार करता तुम्ही जे म्हणता आणि तुम्ही जे करता.ते सुसंगतपणे असेल."