मराठी राजभाषा दिन निबंध लेखन।Marathi Rajbhasha Din Bhashan.

मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?


मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते.


मराठी राजभाषा दिन निबंध लेखन।Marathi Rajbhasha Din Bhashan.
मराठी राजभाषा दिन 


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा मराठी राजभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

 

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, 
हिच्या संघाने जागल्या, दरी खोऱ्यातील शिळा. 
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, 
ज्यांच्या दुर्दम धिराने, केली मृत्यूवरी मात - कुसुमाग्रज.


यांच्या या ओळीने अवघ्या मराठी जणांना अभिमान दिले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले, म्हणूनच त्यांचे जन्मदिवसाला हा दिन साजरा करण्यात येतो. 


Join : Whats App Channel


क्रांतीचा जयजयकार वेड्यात मराठी वीर दौडले सात आघाडी आणि जमीन पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कविता आजही खूप लोकप्रिय आहेत.


मराठी भाषा ही 9 व्या शतकापासून प्रचलित आहे. व तिची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे.

 

माझा मराठीची बोलू कौतुके। 
परी अमृता तेही पैजासी जिंके। 
ऐसी अक्षरे रसिके मेळविन।


असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की, मराठी भाषेचा गोडवा अमृता पेक्षाही जास्त आहे.


मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा व कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच ठीक ठिकाणी मराठी नाटके काव्य संमेलन व मराठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने